in ,

LoveLove

शेवळीची भाजी

शेवळी/शेवळा ही पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ आणि दुर्गम आदिवासी भागात येणारी रानभाजी आहे. ही भाजी खाल्ल्याने पावसाळ्यात होणाऱ्या अनेक रोगांपासून आपले रक्षण होते असे आदिवासी भागात म्हटले जाते. ह्या भाजीत भरपूर जीवनसत्त्वे असतात म्हणून वर्षांतून एकदातरी ही भाजी खावी. मुंबईमधे ज्या भागात आदिवासी वस्ती आहे तिथे ही भाजी मिळते वसई-विरार, ठाणे, पनवेल मधे मिळू शकते. भाजी बारीक कापून कुरकुरीत तळून फ्रीझरमध्ये ठेवली तर ६ महिने चांगली राहू शकते.

वरची पानें काढून टाकली जातात. आतमधली पानें धुवून बारीक चिरून भाजीत वापरू शकतो. वरची पानें काढल्यावर आतमध्ये एक कांंडी दिसेल त्या कांंडीचा वरचा पिवळा भाग कापून फेकून द्यायचा आहे कारण तो खाजरा असतो.

ही भाजी करण्याच्या बऱ्याच पध्दती आहे काही जण फक्त शेवळींची रस्सा किंवा सुक्की भाजी करतात. काहीजण मोडाच्या धान्यासोबत करतात, काहीजण काकडा घालून करतात आणि काहीजण मांसाहारी पदार्थ घालून करतात. कशीही करा ती छानच लागते.

 

साहित्य:

७-८शेवळीच्या कांड्या
२ मध्यम आकाराचे कांदे
१ वाटी सुके खोबरं किस
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा धने, १ चमचा जिरं
३ लवंगा
लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आवडीप्रमाणे
थोडी चिंच
चवीपुरता गूळ
४ चमचे तेलं
फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता
सजावटीसाठी कोथिंबीर

कृती:

– सर्वप्रथम शेवळीचे वरचे पानं काढून आतली पानं आणि कांड्या वेगळ्या करून घ्या. पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

– कांड्याचा पिवळा भाग कापून फेकून द्या.

– बाकीचा भाग बारीक चिरून घ्या.

– चिरलेली पानं आणि कांड्या पाण्यामध्ये १० मिनीटं उकळवून घ्या. उकळलेलं पाणी टाकून द्या.उकळताना पाण्यात चिंच टाका म्हणजे भाजी खाजरी नाही होत.

– आता किसलेलं खोबरं, कांदा, लसूण, जिरं, धने आणि लवंगा एका कढईत लालसर भाजून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

– आता छोट्या कुकरमध्ये तेलं टाकून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून घ्या आणि मिक्सरमधील वाटण आणि लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ टाकून परतवून घ्या.

– आता उकळलेली भाजी टाकून परत १ मिनिटं परतवून घ्या. जेवढा रस्सा हवा असेल तेव्हढं गरम पाणी आणि गूळ टाकून शिट्टी लावून २ शिट्ट्या करून घ्या.

– कुकर थंड झालं कि झाकण काढून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.

What do you think?

Written by Bhakti D

Bhakti is a dedicated full-time certified yoga instructor and follows yogic teachings as a way of life rather than a fitness goal. Yoga has helped her lead stress-free life for herself as well as has a calming influence on the family. After she realized the goodness of Yoga, she decided to pursue Yoga more seriously by building on Yoga related competencies. She has done a number of classrooms as well as one to one teaching sessions in Mumbai, helping her clientele achieve a happy and healthy lifestyle.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

15 Best Watching Shows on Netflix

10 Times when Priyanka Chopra and Nick Jonas gave fashion goals